जळगाव:- जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-विरवाडा रस्त्यावर एक भीषण अपघाताची घटना घडलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आदळलीय. या भीषण अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन जण ठार तर तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना सकाळच्या सुमारास अर्टिका या गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत हे दोन व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बंटी रविंद्र कोळी आणि राकेश भगवान राजपूत गिरासे या दोन जणांना मोरेश्वर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. तर विजय अमृत भोई यांना गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना जळगाव येथ हलवण्यात आलेले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजक वर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करत आहेत.













Leave a Reply